महाराष्ट्रातील सात आश्चर्य । maharashtra seven Āscarya
महाराष्ट्रातील सात आश्चर्य
नमस्कार मंडळी तुम्हाला जगातील सात आश्चर्याची माहिती असेल. जसे जगात सात आश्चर्य आहेत. तसेच सात आश्चर्य आपल्या महाराष्ट्र पण आहेत. आणि ते जर माहीत नसतील तर ते तुम्हाला लवकरच माहिती होतील . ते आश्चर्य खाली दिलेली आहेत.
1) छ.शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई :
आधीचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी), बोरीबंदर मुंबई आहे एक ऐतिहासिक स्थान असुन. ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थंळामध्ये त्यांचा समावेश आहे. आणि ते मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे . हे स्थानक बोरीबंदर येथे 1887 विक्टोरिया राणीच्या राज्यभिषेकानिमित्त बाधंण्यात आले होते. Maharashtra.
2) ग्लोबल पागोडा (मुंबई)
विश्व विपसना पॅगोडा हा गोराई येथे उभारण्यात आला मुंबईला सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २००० वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे विपश्यना ध्यान ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे.
3) दौलताबादचा किल्ला.
दौलताबाद हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादवांचा किल्ला आहे.
4) कास पठार
कास पठार हे फुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. ते सातारा जिल्ह्यात असुन या पाठाराचा समावेश आहे 2012 साली जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. कास पठार हे एक पर्यटनस्थळ आहे. या पठारावर या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.
5) रायगड
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील एक डोंगरी किल्ला हा किल्ला शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून प्रसिद्ध होता.
6) लोणार सरोवर :
लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे. या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे.
7) अजिंठा लेणी
अजिंठा लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असून या लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.
मंडळी तुम्ही या सात पैकी किती स्थळांना भेटी दिलेल्या आहेत.
Post a Comment